Showing posts with label mahatma gandhi marathi essay. Show all posts
Showing posts with label mahatma gandhi marathi essay. Show all posts

Tuesday, September 22, 2020

महात्मा गांधी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी निबंध
पाहणार आहोत.


राष्ट्रपिता महात्मा गांधी

महात्मा गांधी हे भारतातील महान नेते,वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते.त्यांच्या जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील
पोरबंदर या शहरात झाला.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.गांधीजींच्या आईचे नाव पुतळीबाई होते.गांधीजींचे वडील पोरबंदर येथे दिवाण
होते.

गांधीजींनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले.त्यानंतर ते
उच्चशिक्षण घेण्यासाठी,कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेले.इंग्लंडमध्ये
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे त्यांनी वकिलीचे शिक्षण
घेतले.

गांधीजींनी सुमारे 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केले.तेथे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
गांधीजींना वर्णभेदाचा देखील अनुभव आला होता.तेथील
ब्रिटिश शासन भारतीय लोकांवर अन्याय करत होते.या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी अहिंसा या तत्वांचा उपयोग केला.गांधीजींनी तेथील भारतीय लोकांना त्यांचे नागरी अधिकार मिळवून देण्यासाठी या
अहिंसा सत्याग्रहाचा उपयोग केला.

भारतात आल्यानंतर गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य
देशाच्या सेवेसाठी वाहिले.गांधीजींनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता अशा समस्यांविरुद्ध आवाज उठविला.स्त्रियांना समान हक्क मिळावा,शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली.भारतीय
स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
इंग्रज सरकारविरुद्ध संघर्ष केला.गांधीजींच्या अथक संघर्षामुळे आणि हजारों स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश
गुलामीपासून स्वतंत्र झाला.

30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा...धन्यवाद....

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...